परभणी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणीतील जाहीर सभेत बंडखोर खासदार आणि भाजपवर जोरदार टीका केली. विशेषतः बंडखोर खासदार संजय जाधव यांचा उल्लेख करत त्यांनी, “गद्दार पळून गेला…” अशा शब्दांत हल्लाबोल केला.
सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पक्षाशी गद्दारी करणाऱ्या नेत्यांवर निशाणा साधत जनतेने शिवसेनेच्या विचारांवर विश्वास ठेवून मतदान केले असल्याचे सांगितले. निवडून आल्यानंतर पक्ष सोडणाऱ्या लोकप्रतिनिधींनी मतदारांचा विश्वासघात केला असून, जनताच त्यांना योग्य उत्तर देईल, असेही त्यांनी म्हटले.
यावेळी ठाकरे यांनी भाजपवरही टीकेची झोड उठवत राज्यातील राजकीय घडामोडी, पक्षफोड आणि सत्तेच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आगामी निवडणुकांमध्ये जनतेच्या बळावर पुन्हा शिवसेना उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांच्या या भाषणानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून, त्यांच्या वक्तव्यावर बंडखोर खासदार आणि सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
