पुणे(pune) : पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर महत्त्वाचा उपाय ठरणारी आणि आयटी हब हिंजवडीला शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडणारी पुणे मेट्रो लाईन ३ आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
ही मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर हिंजवडी आयटी पार्क, वाकड, बालेवाडी, बाणेर आणि शिवाजीनगर परिसरातील लाखो प्रवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे या भागांतील रस्ते वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पुणे मेट्रो च्या या नव्या मार्गामुळे पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडणार असून, खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. तसेच, प्रवासाचा वेळ आणि इंधन खर्च दोन्हीमध्ये लक्षणीय बचत होण्याची शक्यता आहे.
हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
