‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६’ला केंद्राची मंजुरी मिळाल्यास धर्मांतराविरोधात कठोर कारवाई शक्य होईल’ : देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६’ संदर्भात महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. या विधेयकाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर धर्मांतरासारख्या कथित बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा होईल, असे त्यांनी सांगितले.

फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६ ला केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर धर्मांतरासारख्या गैरप्रकारांवर प्रभावी आणि कठोर कायदेशीर कारवाई करता येईल. या विधेयकाचा उद्देश कायद्याच्या चौकटीत राहून बेकायदेशीर धर्मांतराला आळा घालणे हा आहे.”

या वक्तव्यानंतर राज्यात धर्म स्वातंत्र्य विधेयकावर पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक चर्चा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *