नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर तीव्र टीका केली आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय हेतूंसाठी वापर केल्याचा आरोप त्यांनी केला.
धर्मेंद्र प्रधान म्हणाले, “संसदेचे अधिवेशन सुरू असताना राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचा निलाजरेपणाने राजकीय शस्त्र म्हणून वापर केला. त्यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपेक्षा देशात अशांतता निर्माण करण्यात अधिक रस आहे.”
NEET परीक्षेतील कथित अनियमितता आणि त्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत.
