Mumbai-पृथ्वी शॉ पुन्हा चर्चेत; साखरपुडा मोडल्याच्या चर्चांना उधाण

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एकेकाळी भारतीय क्रिकेटचे उज्वल भविष्य म्हणून पाहिल्या गेलेल्या पृथ्वी शॉच्या कारकिर्दीवर त्याच्या मैदानाबाहेरील घडामोडींचा परिणाम झाल्याचे मानले जाते.

यावर्षी मार्च महिन्यात त्याने आकृती अग्रवाल हिच्यासोबत साखरपुडा केला होता. मात्र, आता या दोघांचा साखरपुडा मोडल्याच्या चर्चांना जोर आला आहे.

या घडामोडींमुळे सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या असून, चाहत्यांमध्येही याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तथापि, या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

दरम्यान, पृथ्वी शॉच्या क्रिकेट कारकिर्दीवर आणि त्याच्या पुढील वाटचालीवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *