जयपूर(jaipur) : राजस्थानसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये वादळी हवामानाचा इशारा देण्यात आला असून काही ठिकाणी वाऱ्याचा वेग 70 किमी/तासपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
या हवामान बदलामुळे अनेक भागांत धूळवादळ, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
हवामान विभागाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, झाडांखाली थांबू नये तसेच वीज कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे.
राजस्थानमधील जयपूर, जोधपूर, अजमेर, कोटा, अलवर आणि भरतपूर या भागांमध्ये विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही दिवस हवामान अस्थिर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
