काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. प्रकल्पातील खड्डे, निकृष्ट दर्जाची कामे, अपघात आणि जनतेच्या पैशांचा हिशेब मागणाऱ्यांवर टीका करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले.
“मिसिंग लिंक प्रकल्पावर प्रश्न विचारणारे, खड्डे, निकृष्ट दर्जाचे काम, अपघात आणि जनतेच्या पैशांचा हिशेब मागणारे लोक महाराष्ट्राची बदनामी करत नाहीत. उलट, हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प उभे करून काही महिन्यांतच त्यात दोष निर्माण होणे, जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणे आणि जनतेचा पैसा खड्ड्यात जाणे हीच महाराष्ट्राची खरी बदनामी आहे,” असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.
सरकारने टीका करणाऱ्यांना लक्ष्य करण्याऐवजी प्रकल्पातील त्रुटी दूर करून जनतेच्या पैशांचा योग्य वापर झाल्याचे सिद्ध करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
