राम मंदिर देणगी वादावरून काँग्रेसवर गिरिराज सिंह यांचा हल्लाबोल; ‘रामांचे अस्तित्व नाकारणाऱ्यांना बोलण्याचा अधिकार नाही’

राम मंदिर देणगी प्रकरणावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस पक्ष घडियाली अश्रू ढाळत असून, प्रभू रामांच्या अस्तित्वालाच नाकारणाऱ्या पक्षाला या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याची टीका त्यांनी केली.

गिरिराज सिंह म्हणाले, “ज्यांनी प्रभू रामांचे अस्तित्व नाकारले, रामसेतूलाही नाकारले, ती काँग्रेस आज घडियाली अश्रू ढाळत आहे. ‘शंभर उंदीर खाऊन मांजर हजला निघाली’ अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे.” ते पुढे म्हणाले, “काँग्रेसने प्रभू रामांविरोधात जे पाप केले आहे, त्यासाठी राम त्यांना कधीच माफ करणार नाहीत.”

गिरिराज सिंह यांच्या या वक्तव्यामुळे राम मंदिर देणगी वादावरून भाजप आणि काँग्रेस यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *