जगातील सातव्या क्रमांकाचे उंच शिखर माउंट धौलागिरी पुण्याच्या भगवान चवले यांनी केले पादाक्रांत

भगवान चवले यांनी १८ एप्रिल २०२६ रोजी माउंट धौलागिरी हे शिखर सर केले आहे.
भगवान चवले हे मुळशी तालुक्यातील टेमघर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या लव्हार्डे येथील रहिवासी आहेत.एलआयसी (LIC) मध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
त्यांनी १७ मे २०१८ रोजी सकाळी ६:३० वाजता जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट यशस्वीरित्या सर केले होते.एव्हरेस्ट सर करण्यापूर्वी त्यांनी चार वर्षे कठोर प्रशिक्षण घेतले होते. २०१७ मध्ये ते माउंट एवरेस्ट च्या शिखर माथ्यापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर असताना खराब हवामानामुळे त्यांना परत फिरावे लागले होते. मात्र, हार न मानता त्यांनी २०१८ मध्ये पुन्हा प्रयत्न करून यश मिळवले.एव्हरेस्टपूर्वी त्यांनी सह्याद्रीतील खडापारसी, वजीर, ड्युक्स नोज, लिंगाणा, तैलबैल, ढाकभैरी यांसारखी कठीण शिखरे आणि हिमालयातील स्टोक कांगरी, घोलप कांगरी, भागीरथी, आयलंड पीक सर केली आहेत.
एव्हरेस्टनंतर त्यांनी जगातील पाचवे सर्वात उंच शिखर माउंट मकाऊ (Mount Makalu) देखील सर केले आहे. आत्तापर्यत श्री भगवान चवले यांनी माउंट एव्हरेस्ट,माउंट कांचनजंगा, माउंट मकालु,माउंट ल्होत्से,माउंट मनास्लु,
माउंट अन्नपूर्णा १,
माउंट अमादबलम,
माउंट लोबुचे, हि सर्व अष्टहजारी शिखरे समिट केली आहेत.
धौलागिरी शिखर हे हिमालयातील एक प्रमुख आणि जगातील सातवे सर्वात उंच शिखर आहे.धौलागिरी पश्चिम-मध्य नेपाळमध्ये आहे.
धौलागिरी’ हे संस्कृत शब्द ‘धवल’ (पांढरा) आणि ‘गिरी’ (पर्वत) यावरून बनले आहे, ज्याचा अर्थ “पांढरा पर्वत” असा होतो.
हे शिखर काली गंडकी नदीच्या खोऱ्याच्या पश्चिमेस आहे, जी जगातील सर्वात खोल दऱ्यांपैकी एक मानली जाते.
धौलागिरी शिखराची उंची ८,१६७ मीटर (२६,७९५ फूट) आहे.जगातील सातव्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर आहे.हे पूर्णपणे नेपाळच्या सीमेत असलेले सर्वात उंच शिखर मानले जाते.१३ मे १९६० रोजी स्विस-ऑस्ट्रियन पथकाने (मॅक्स आयसेलिन यांच्या नेतृत्वाखाली) पहिल्यांदा हे शिखर सर केले. या पर्वताच्या दक्षिणेकडील भिंत १५,००० फूट उभी आहे, ज्यामुळे यावर चढाई करणे अत्यंत आव्हानात्मक मानले जाते.१८०८ मध्ये शोध लागल्यावर, याला काही काळ जगातील सर्वात उंच पर्वत मानले जात होते. धौलागिरी हे शिखर या अगोदर महाराष्ट्रातील तीन जणांनी यशस्वी सर केले आहे. प्रसाद जोशी, केवल कक्का व जितेंद्र गवारे.यांच्या नंतर आता १८ एप्रिल २०२६ रोजी रोजी एव्हरेस्ट वीर श्री भगवान चवले यांनी हे शिखर सर केले आहे. श्री भगवान चवले यांनी नेपाळमधील सर्व ७ अष्टहजारी शिखरे यशस्वी सर केली आहेत. असे करणारे ते कदाचित देशातील पाचवे गिर्यारोहक असतील.
या मोहिमेमध्ये महाराष्ट्रातील अजून २ गिर्यारोहकांनी हे शिखर सर केले PI शिवाजी ननावरे व SPI द्वारका ढोके या दोघांनीही या शिखराला यशस्वी गवसणी घातली. हे दोघेही पोलिस प्रशासनातील अधिकारी आहेत. यामुळे महाराष्ट्र पोलिससाठी सुध्दा गौरवाची बाब आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *